Posts

Showing posts from February, 2019

मैत्रीचा ठेका नक्की कुणाचा ?

आपल्या बॉलीवूडने मुलांना चांगल काय शिकवलं नसलं तरी एक गोष्ट मात्र नक्कीच शिकवली आहे आणि ते म्हणजे मैत्री. 'दोस्ताना', 'दिल चाहता है', 'शोले' अगदी अलीकडचे 'संजू', 'थ्री इडियट' आणि अजून बरेचं काही... या सर्व चित्रपटामध्ये लक्षात राहतो तो कार्तिक आर्यनचा 'सोनू के टीटू कि स्वीटी'. म्हणजे मित्राला एखादी मुलगी किती वाईट आहे हे जीव तोडून सांगितलं तरी तो ऐकत नाही पण ज्यावेळी 'तुला मुलगी पाहिजे कि मी' असा प्रश्न विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावता 'मला मित ्र पाहिजे' असं बोलून मैत्रीचा आदर्श निर्माण केला गेला. मुलं सहज म्हणतात कि भावा 'प्रेमापेक्षा मैत्रीवर आहे', 'लडकी बाद में पहले अपनी दोस्ती', 'तू अभी इतनी अमीर नहीं हुई कि हमारी दोस्ती खरीद सके' etc. etc...... हे सगळं ठीक आहे, सगळं चांगल देखील आहे पण सध्या मैत्री निभावण्याचा आणि जपण्याचा ठेका फक्त मुलांनीच घेतला आहे. प्रेमाच्या नात्यात प्रेयसीला किती स्थान द्यायचं आणि मित्रांना किती स्थान द्यायचं हे फक्त आणि फक्त प्रियकर ठरवतो अर्थात दोघांच्या वतीन...