Posts

Showing posts from 2019
Image
संदेसे आते है..... शौर्याम   दक्षम युधे बलिदान परमो धर्मा।।   प्रत्येक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला हमखास लागणारं गाणं. कधी कधी माझ्यासारखे लोक सहज म्हणून देखील हे गाण आपल्या प्लेलिस्ट मध्ये ठेवतात आणि ऐकतात देखील. आज 15 ऑगस्ट म्हणून माझं देशप्रेम नेहमीपेक्षा जरा जास्त नक्कीच उफाळून आलं म्हणून सकाळी उठल्यापासून देशाप्रति आपलं प्रेम दाखवायची गाणी घरात लावलेली. सांगायला खरंच लाज वाटते पण शाळा संपल्यानंतर नीटसा असा स्वातंत्र्य दिवस साजरा केलाच नाही पण हा देशप्रेम माझ्यात नक्कीच बऱ्यापैकी आहे असं मला वाटंत. असो, विषय भरकटतोय, हा तर संदेसे आते है, हे गाणं ऐकलं की नकळतपणे प्रत्येकाचं देशप्रेम, सैनिकांप्रति आपुलकी त्यांचा हेवा, कौतुक, मान, सन्मान आणि ऊर भरून येण्याची भावना अशा सगळ्याच भावना एकत्र दाटून येतात. मला आठवतंय ज्यावेळी मुंबईमध्ये डॉक्टरांना मारहाण झाली होती आणि ते संपावर गेले होते त्यावेळी सैनिकांसोबत त्यांची तुलना केली जात होती की सैनिक आपलं काम सोडून कधी संपावर गेले तर किंवा ते कधी काहीच मागणी करत नाही अँड ऑल असं बरंच काही. त्यावेळी एक कमेंट मी वाचली होती की...

मैत्रीचा ठेका नक्की कुणाचा ?

आपल्या बॉलीवूडने मुलांना चांगल काय शिकवलं नसलं तरी एक गोष्ट मात्र नक्कीच शिकवली आहे आणि ते म्हणजे मैत्री. 'दोस्ताना', 'दिल चाहता है', 'शोले' अगदी अलीकडचे 'संजू', 'थ्री इडियट' आणि अजून बरेचं काही... या सर्व चित्रपटामध्ये लक्षात राहतो तो कार्तिक आर्यनचा 'सोनू के टीटू कि स्वीटी'. म्हणजे मित्राला एखादी मुलगी किती वाईट आहे हे जीव तोडून सांगितलं तरी तो ऐकत नाही पण ज्यावेळी 'तुला मुलगी पाहिजे कि मी' असा प्रश्न विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावता 'मला मित ्र पाहिजे' असं बोलून मैत्रीचा आदर्श निर्माण केला गेला. मुलं सहज म्हणतात कि भावा 'प्रेमापेक्षा मैत्रीवर आहे', 'लडकी बाद में पहले अपनी दोस्ती', 'तू अभी इतनी अमीर नहीं हुई कि हमारी दोस्ती खरीद सके' etc. etc...... हे सगळं ठीक आहे, सगळं चांगल देखील आहे पण सध्या मैत्री निभावण्याचा आणि जपण्याचा ठेका फक्त मुलांनीच घेतला आहे. प्रेमाच्या नात्यात प्रेयसीला किती स्थान द्यायचं आणि मित्रांना किती स्थान द्यायचं हे फक्त आणि फक्त प्रियकर ठरवतो अर्थात दोघांच्या वतीन...